फलक नगरी - मुंबई

" दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या", "नांनाचे संघटन अधक्ष्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन", साहेबांच्या हस्ते भूमिपूजन" अशी फलक तुम्ही रोज जाता येता नाक्या नाक्यावर पहात असणार किती बरे वाटते ना की ही आपली सुंदर मुंबई ह्या फलाकांमुले किती गोजिरवाणी दिसते ना?
हल्ली राजकारणाचे महत्व हे शिक्षणा पेक्षा जास्त आहे शिक्षण पूर्ण करने आणि त्याचानंतर नोकरी शोधने अशी तारेवरची कसरत करावी लागते परन्तु राजकारणी बनायला कशाची म्हणजे कशाचीही गरज लागत नाही एकतर खानदानी वारचा हक्क अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नाहीतर गडगंज संपत्ती आणि ज्यांचाकडे हे सर्व नाही ते कार्यकर्ते अशाप्रकारे हे सर्व काही ठरल्याप्रमाणे असते. मग काय एकमेकांचा उदोउदो करण्यासाठी ही सगळी पोस्टरबाजी आणि त्यात त्रास होतो तो आपल्या मुंबईच्या सुंदरतेला। पण ह्या दादा, भाई आणि साहेबांना त्याचे काय हो...........म्हणतात ना अपना काम बनता ......... मैं जाये जनता.

जय महाराष्ट्र!!!
गणेश थोरात.
0 Responses