राज ठाकरे : मराठी हृदयसम्राट.

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्याने स्थापन झालेल्या राजकिय पक्षाचे संस्थापक आहेत. तसेच शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षमुद्दा महाराष्ट्र व मराठी केंद्रीत ठेवला आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात वास्तव्यास असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिकांना आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवरयात राहिले.
वैयक्तिक.
राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. त्यांचे वडिल श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई कुंदा ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांची बहिण आहे. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये झाले. राज ठाकरे हे त्यांच्या ठाकरे घराण्यातील इतरांप्रमाणे व्यंग चित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्ने साठी कार्टून करणे नक्कीच आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे. शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या पत्नी असून, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
राजकिय वाटचाल
शिवसेना

ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सूरु केली. उमदे प्रभावी व्यक्ती मत्व म्हणून राज ठाकरे यांनी आपला मोठा समर्थकांचा पाठिंबा मिळवला. शिवसेनेतीला तरुणांचा पाठिंबा बळकट करण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्वाचा समजला जातो. बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सुत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. इ.स २००६, मार्च मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेने मध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजा भावाची वागणूक देत असल्याच्या कारणावरुन शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसातच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. आपण कोणत्याही पक्षात सामील होणार नाही अशी घोषणा त्यांनी केली होती.
महाराष्ट नवनिर्माण सेना.

एप्रिल २००६ मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (इथून पुढे मनसे संक्षिप्त) या पक्षाची स्थापना केला. मराठी माणसाचे हितरक्षण व उन्नती हा या पक्षाचा प्रमुख मुद्दा आहे. शिवसेना हा पक्षही मराठी मुद्यावर स्थापन झाला होता. परंतु शिवसेनेने ह्या मुद्याला बगल दिली असल्याची पक्षाची भावना आहे. सुरुवातीला शिवसेनेतील राज ठाकरे समर्थक लगेचच या पक्षात सामील झाले तर नवी राजकीय कारकीर्दीस उत्सुक असलेल्या अनेकांनी या पक्षात प्रवेश केला. राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापने पासून प्रभावी भाषणांचा सपाटा लावला. पहिल्या भाषणांमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असेल यावर भर दिला गेला. स्थानिक मराठी तरुणांना नोकर्यांमध्ये प्राधान्य हा त्यातील प्रमुख मुद्दा होता. तसेच महाराष्ट्रातील राजकिय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिचे उन्नतीकरण होईल अश्या प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.
उत्तरप्रदेशी व बिहारी
वरील टिका.राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणार्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई पहिलेच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल,असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोंढ्यावर आपला शाब्दिक हल्ला चढवला. या राज्यातील राजकारण्यांमुळे ही या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात यातील सर्वात जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भरावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टिका केली. लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकिय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येउन येथील स्थानिक लोकांच्या नोकर्यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येउन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करण्याचा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येउन मराठी शिकत नाहीत त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभवला भाषिक अस्मिता दिली. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तामिळनाडू पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत ह्या राज्यात ह्या देशांमध्ये बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत संमिलीत होत नाहीत व उलटे मराठीला हिन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अश्या प्रकारचे अनेक आरोप टिका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतीतून स्पष्टपणे व्यक्त केली.
मनसे विरुध समाजवादी पा
र्टी.३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी लिहिलेले भित्तीपत्रे (युपी बिहार तो हमारा है| अब कि बारी बंम्बई है|) व समाजवादी पक्षाची प्रक्षोभक भाषणे हे कारण ठरले. राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टिकास्त्र सोडले व सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकिर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात अखडता घेतात. फेब्रुवारी १३ २००८ रोजी राज्य सरकारला या प्रकरणी ढिलाई दाखवल्याची टिका सहन करावी लागली व कृती म्हणून राज ठाकरे व समाजवादी पार्टी चे अबू आझमी यांना अटक करण्यात आली. जरी दोघांना त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास बंदी घालण्यात आली. या अटकेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली व उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिकांवरील रोष अजून वाढला. परिणामी अनेक ठिकाणांवरुन उ.प्रदेश व बिहार मधील कामगार आपपल्या गावी पळून गेले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण् झाला. या घटनेनंतरही लहान सहान घटना घडत राहिल्या. कामगारांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मनसे ने कामगार भर्ती साठी बेरोजगार मराठी तरुणांना कामास ठेवावी अशी विनंती अनेक उद्योग व बांधकाम व्यावसायिकांना केली. अनेक जिल्ह्यात मराठी तरुणांसाठी अर्ज नोंदणी मेळावे आयोजित करण्यात आले.
अटकसत्र
ऑक्टोबर मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले. या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती परिक्षा. पश्चिम रेल्वेच्या परिक्षा मनसे व शिवसेनेने उधळून लावल्या व आलेल्या उत्तर भारतीय परिक्षार्थींना पळवून लावण्यात आले. मनसे व शिवसेनेने या पश्चिम रेल्वेच्या भर्ती परिक्षांसाठी बिहारी परिक्षार्थींचीच का निवड करण्यात् आली तसेच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परिक्षेची सूचना न देण्यास कारण काय? या घटनेनंतर प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईस आणण्यात आले. परंतु या काळात उत्तर भारतीयांविरुद्ध होणारा दंगा बळावला व मुंबई नंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पसरला. या काळात प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली. लालूप्रसाद व नितीशकुमार या बिहारी नेत्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सांगितले. राज ठाकरे यांच्यावर एकूण ८४ विविध प्रकारचे गुन्हे दाखले करण्यात आले. मनसे च्या कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी धरपकड करण्यात् आली. बिहारमध्येही यावर प्रतिक्रिया म्हणून अनेक रेल्वे जाळण्यात आल्या. दिल्लीमधील महाराष्ट्र सदन या कार्यालयावर हल्ला करुन मोड तोड करण्यात् आली. या घटनेनंतर नारायण राणे, छगन भुजबळ, यासारखे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर टिका केली. शोभा डे या मान्यवर लेखिकेनी देखील आय.बी.एन या वाहिनीवर डेव्हिल्स ऍडव्होकेट या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले. प्रसारमाध्यमांनी देखील राज ठाकरे व मराठी भाषिकांचे मत ही भूमिका समजून न घेता बायस टिका करण्याचा बेजवाबदारपणा दाखवला असे मत होते. ( बिहारमधील रेल्वे जाळणारे त्यांना विद्यार्थी संबोधले व महाराष्ट्रात दंगे करणारे मनसेचे गुंड असे संबोधले गेले).
विधानसभा निव
डणुक २००९.संसदेच्या निवडणुकीमधे मनसेला मराठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लाखभरावरती मते मनसेच्या उमेदवाराना मिळाली. विरोधी पक्षांचे धाबे दणाणले. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुक २००९ मध्ये झाली मनसेचे चक्क १३ आमदार निवडून आले. हा करिश्मा होता राजठाकरेचा व मराठी मतांचा आणि राज ठाकरे हे मराठी हृदयसम्राट झाले।
मुळ लेख मराठी विकिपीडीया मधील
जय महाराष्ट्र!!!
गणेश थोरात.
Post a Comment